
वंध्यत्वाबद्दल असलेले ज्ञान मर्यादित असण्यासह याबाबत तितकेच गैरसमज देखील आहेत. जगभरातील बर्याच भागात वंध्यत्वाबद्दल अपुरे ज्ञान आहे.सर्वांत मोठा गैरसमज म्हणजे ही समस्या फक्त स्त्रियांशी निगडीत आहे.आपण एक लक्षात घेतले पाहिजे की,बाळ होण्यासाठी स्त्री आणि पुरूष हे दोघेही आवश्यक आहेत. संसारवेलीवर एक फूल उमलणे हा आयुष्यातील अतिशय मोठा टप्पा असतो,पण काही जोडप्यांमध्ये वंधत्वाची समस्या हा आनंद हिरावून घेतो.आयव्हीएफ या तंत्रज्ञानाने अपत्यहीन जोडप्यांचे जीवन सुखमय केलं आहे.
वंध्यत्वाची कारणांमध्ये नियमित स्त्री बीज तयार न होता किंवा स्त्री बीज प्रकियेत अडथळा निर्माण होणे,गर्भनलिका बंद असणे,गर्भनलिकेची कार्यक्षमता कमी होणे,पुरूषांमध्येही वंध्यत्वाचे कारण म्हणजे शुक्राणूंची संख्या किंवा हालचाल तसेच रचनेमध्ये बिघाड असणे यांचा समावेश आहे.
वर्षभरात अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न केल्यानंतर देखील जोडप्याला बाळ होऊ शकत नसेल तर अशा परिस्थितीला वंध्यत्व म्हणतात.अशांनी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.पण तरी सुध्दा स्त्रीचे साधारण वय 35 पेक्षा अधिक असेल, तिच्या पोटाच्या काही शस्त्रक्रिया झाली असेल,तिची मासिक पाळी ही अनियमित असेल किंवा तिच्या जोडीदाराच्या शुक्राणूंची संख्या कमी-जास्त असेल,हालचाल कमी असेल तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
वंध्यत्वाची उपचाराची सुरूवातच तपासण्यांनी होते. स्त्रीचे शरीर गर्भधारणेसाठी योग्य आहे की नाही हे बघण्यासाठी स्त्रीयांच्या रक्ताच्या तपासण्या कराव्या लागतात,त्याचप्रमाणे तिच्या शरीरात हार्मोन्सचे प्रमाण योग्य आहे की नाही,यासाठी हार्मोन्सची चाचणी करावी लागते.स्त्रीयांची रक्त तपासणी झाली की,पुरूषांच्या वीर्याची तपासणी केली जाते.वीर्यामध्ये असलेल्या शुक्राणूंची संख्या,हालचाल,रचना,डीएनए फ्रॅगमेंटेशन इंटेक्स या सर्वांची तपासणी करावी लागते. या चाचण्यांनंतर सर्वांत महत्त्वाचा अवयव जो,गर्भधारणेसाठी अतिशय महत्वाचा असतो तो म्हणजे गर्भनलिका. या गर्भनलिकेमध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणू यांचे मिलन होत असते. जर या गर्भनलिका बंद असतील तर नैसर्गिक गर्भधारणा हे एक मोठे आव्हान आहे.
त्यामुळे गर्भनलिकेची तपासणी गर्भाशयाच्या एक्स रे किंवा गर्भनलिकाचा एक्स रे काढून करण्यात येते. गर्भनलिकेची तपासणी साधारणत: पाळीच्या 7 व्या किंवा 8 व्या दिवशी केली जाते.पाळीच्या 11 व्या दिवसापासून स्त्रीबीज कधी तयार होत आहे,त्याची वाढ कशी होत आहे,त्याचा आकार,त्याचा योग्य आकार होतोय की नाही,याचे निरीक्षण केले जाते.त्याचबरोबर गर्भ रूजण्यासाठी आतमध्ये एंडोमेट्रियम अस्तर व्यवस्थित निर्माण होते की नाही,याचे देखील निरीक्षण करावे लागते.या तपासण्यानंतर 15 दिवसांत समजते की,त्या जोडप्यामध्ये वंध्यत्वाचे नेमके कारण काय आहे.
पण कित्येक वेळेला सर्व रिपोर्टस नॉर्मल आहेत,कुठल्याही तपासणीमध्ये कोणतीच समस्या नाही,असे असल्यास मायक्रोस्कोपिक तंत्रज्ञानाच्या आधारे म्हणजेच अंडाशयाच्या बाहेरील कवच खूप टणक असेल किंवा शुक्रांणूंची अॅक्रोसीमल कॅप व्यवस्थित आहे की,गर्भनलिकांच्या आतील रचनांबद्दल निरीक्षण करणे गरजेचे असते.
टेस्ट ट्युब बेबीद्वारे जन्माला येणारे मूल हे नैसर्गिक पध्दतीने जन्माला आलेल्या बाळासारखेच सामान्य,सशक्त,निरोगी असते.या तंत्रज्ञानामध्ये आपण स्त्रीयांची अंडी बाहेर काढून घेतो ,पुरूषांचे शुक्राणू बाहेर काढतो,त्यांचे फलन केले जाते.आयव्हीएफमध्ये होणारे मूल हे त्या जोडप्याचेच असते.आयव्हीएफ प्रक्रिया घेणार्या स्त्रीला इंजेक्शन्स देऊन तिच्या शरीरात अंडी तयार केली जातात.ती अंडी योग्य आकाराला पोहचली की बाहेर काढावी लागतात.बाहेर काढल्यानंतर लॅबमध्ये स्त्रीच्या जोडीदाराचे शुक्राणू घेण्यात येतात.ते शुक्राणू धुवून त्यांचे मिलन हे अंड्याबरोबर केले जाते आणि तयार होणारा गर्भ शरीरात सोडला जातो.
आयव्हीएफ प्रक्रियेदरम्यान 10 ते 12 दिवस इंजेक्शन्स घ्यावी लागतात.स्त्रीची अंडी जेव्हा बाहेर काढतात,त्याला ओव्हम पिकअप प्रक्रिया म्हटले जातेे.रोपण करायची प्रक्रिया वेदनाविरहीत प्रक्रिया आहे. यासाठी हॉस्पिटलमध्ये काही तास विश्रांती घेणे गरजेचे असते. एकदा गर्भ रूजला की,त्यापुढील सर्व प्रक्रिया ही नैसर्गिक असते. एकदा रोपण झाल्यानंतर, उर्वरित गर्भधारणा अत्यंत सामान्य असते. त्यामुळे पूर्ण विश्रांतीची आवश्यकता भासेलच असे नाही.
आयव्हीएफ प्रक्रिया करणार्या 40 ते 45 टक्के जोडप्यांना पहिल्या प्रयत्नात अपत्यप्राप्ती होते. तर काहींना त्यानंतरही प्रयत्न करावे लागतात.जर पहिलाच प्रयत्न अयशस्वी झाला तर अनेक जोडपे सामान्यत: आशा गमावतात. ते डॉक्टर बदलण्याचा पर्याय निवडतात आणि पुन्हा नव्याने सुरूवात करतात. मात्र मागील डॉक्टरांनी केलेला अभ्यास वाया जातो. अंड्यांची गुणवत्ता, शुक्राणूंची गुणवत्ता, एंडोमेट्रियल अस्तर, गर्भाशयातील रक्तपुरवठा यासारख्या अनेक कारणांमुळे ही प्रक्रिया अयशस्वी ठरू शकते.शक्यतो आयव्हीएफ प्रक्रियेच्या सायकलमध्ये अंतर असू नये.
Have queries or concern ?
About Author
Dr. Supriya Puranik
Infertility Expert
Contact: +91 88888 22222
Email – ask@sahyadrihospitals.com
Patient Feedback

Great doctors, Good facilities, caring and helping staff. I recommend this hospital for day care services.
Sangram Shinde

All doctors r very good. There treatments is best. Other staff also good. The service of nurses is great...Hospital is always clean.
Vaishali Aitawade

All services provide by hospital are nice and on time. Doctors are polite and co-operative with patient.
Ankita Jagtap

All services provided by hospital is good. Hygiene maintained well.Even at night good care provided.