Home > Blogs > Neonatology > नवजात बालकांमध्ये होणारी कावीळ
नवजात बालकांमध्ये होणारी कावीळ
कावीळ म्हटलं की सहसा सामान्य माणूस घाबरतो,मात्र वास्तविकरित्या लहान मुलांमधील कावीळ ही प्रौढांमध्ये होणारी कावीळ याच्याशी जोडू नये. नवजात बाळांच्या काविळीमुळे पालक चिंताग्रस्त होतात.जन्मानंतर अनेक बालकांना कावीळ होते. मुदतपूर्व जन्माला आलेल्या बालकांमध्ये हे प्रमाण थोडे जास्त दिसून येते.ज्यांचे वजन 1800 ग्रॅम पेक्षा कमी असतेे,अशांमध्ये कावीळ जास्त दिसून येते आणि या बालकांना नवजात अतिदक्षता विभागात उपचार दिले जातात. मात्र ज्या बालकांना पहिल्याच दिवशी कावीळ होते,त्यांच्यावर मात्र लगेचच उपचार करण्याची गरज असते.
प्रौढांमधील कावीळ ही अन्न,पाणी व रक्तातील समस्यांमुळे उद्भवू शकते.नवजात बालकांमध्ये यकृत पुरेसे विकसित झालेले नसल्याने रक्तातील बिलीरूबिन हा पिवळा घटक पूर्णपणे बाहेर काढला जात नाही.अतिरिक्त बिलीरूबीन साठल्यावर त्वचा आणि डोळे हे पिवळे दिसायला लागतात.या स्थितीला लहान मुलांमधील सामान्य किंवा फिजिओलॉजिकल कावीळ असे म्हणतात. तर ज्या बाळांना उपचारांची आवश्यकता असू शकते त्यांना पॅथालॉजिकल कावीळ असे म्हणतात. या प्रकारची कावीळ तिसर्या किंवा चौथ्या दिवशी सुरू होते आणि आठवड्याने कमी व्हायला लागते.बहुतांश बालकांमध्ये हे आढळून येते.त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही.
बालकांमध्ये कावीळ होण्याच्या सामान्य कारणांपैकी एक म्हणजे मातेचा आणि बाळाचा रक्तगट न जुळणे – या स्थितीला ब्लड इनकॉम्पॅटॅबिलिटी असे म्हणतात.हे रक्तगट न जुळ्याने लाल रक्तपेशींचे नुकसान होते व कावीळ होण्याची शक्यता बळावते.
याशिवाय ज्या बालकांचे वजन कमी आहे म्हणजेच 2.5 किग्रॅ पेक्षा कमी आहे,विशेष करून 2 किग्रॅ पेक्षा वजन कमी असणार्या बालकांना कावीळ होण्याची शक्यता जास्त असते.
मुदतपूर्व जन्माला येणारी बालके म्हणजेच 34 आठवड्यांपूर्वी जन्माला येणार्या बालकांना कावीळ झाल्यास एनआयसीयूमध्ये उपचार दिले जातात.
स्तनपान कमी झाल्यास व बाळाच्या शरीरात दूधाचे प्रमाण कमी असल्यास देखील कावीळ होऊ शकते.विशेेष करून जी बालके उन्हाळ्यात जन्माला येतात,व ज्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते त्यांना कावीळ होण्याची शक्यता असते.
याशिवाय जर फोरसेप्स डिलिव्हरी झाली असेल (उपकरणांचा वापर करून बाळाचे डोके मातेच्या शरीरातून बाहेर काढायला मदत करण्याची प्रक्रिया) अशा वेळेस डोक्याला सूज आली असेल तरी कावीळ होऊ शकतेे.
बाळाच्या जन्मानंतर तीन ते पाच दिवस डॉक्टरांद्वारे अधिक लक्ष ठेवले जाते.त्याचवेळी कावीळीची तपासणी देखील केली जाते.नवजात बाळांमध्ये कावीळीचे निदान करण्यासाठी ट्रान्सक्युटेनियस बिलीरूबिनोमेट्री या उपकरणाद्वारे चाचणी केली जाते.तसेच बाळमध्ये पिवळसरपणा दिसणे,बाळाचे वजन तपासणे,उपकरणाद्वारे कावीळीची पातळी तपासणे,ही पातळी जास्त असेल तर रक्ताचा नमुना घेऊन चाचणी केली जाते.
उपचारपध्दती
उपचारपध्दतीमध्ये सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे,जन्मानंतर पहिल्या 30 मिनिटांत मातेचे दूध बाळाला देणे,असे केल्याने कावीळ होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.स्तनपान घेणार्या बाळांना दिवसातून 3/3 वेळा आहार देणे आवश्यक आहे.
फोटोथेरपी
फोटोथेरपीमध्ये बाळांच्या डोळ्यांना पट्टी लावून त्यांना दिव्याखाली ठेवले जाते.निळ्या-पांढर्या रंगांच्या लाईटस असतात,या प्रकाशाच्या उपचारांमुळे शरीरातील कावीळ कमी होऊन बाळाच्या मुत्र किंवा मलातून बाहेर पडते.फोटोथेरपी ही बाळासाठी सुरक्षित आहे,या थेरपीने 2 ते 4 दिवसांत कावीळ कमी होतो.
एक्सचेंज ट्रान्सफ्युजन
यामध्ये बाळाच्या शरीरातील कावीळीचे अशुध्द घटक असतात,ते काढून नवीन पध्दतीचे रक्त दिले जाते,त्याला एक्सचेंज ट्रान्सफ्युजन म्हणतात.यामुळे मेंदूपर्यंत जाणारी गंभीर कावीळ व त्यासंदर्भातील गुंतागुंत टाळता येऊ शकते.मात्र ही परिस्थिती आता दुर्मिळ झाली आहे,त्यामुळे याबाबत चिंता नसावी.
काही बालकांचे वजन अधिक प्रमाणात कमी झाल्यास त्यांना सलाईनद्वारे उपचार केले जातात.ज्यामुळे शरीरातील कमी झालेले पाण्याचे प्रमाण वाढू शकते.
सामान्यत: जन्म झाल्यावर तिसर्या-चौथ्या दिवशी माता-बालके आपल्या घरी जातात.मात्र घरी गेल्यावर साधारण दोन दिवसांनी पुन्हा बालरोग तज्ञाला दाखविणे योग्य ठरेल,जेणे करून बालकाचे स्तनपान योग्यरित्या सुरू आहे की नाही,वजन कमी झाले नाही ना आणि कावीळची पातळी वाढली नाही ना हे तपासून घेता येईल.
Have queries or concern ?
About Author
Dr. Pradeep Suryawanshi
Contact: +91 88888 22222
Email – ask@sahyadrihospitals.com
Patient Feedback
Great doctors, Good facilities, caring and helping staff. I recommend this hospital for day care services.
Sangram Shinde
All doctors r very good. There treatments is best. Other staff also good. The service of nurses is great...Hospital is always clean.
Vaishali Aitawade
All services provide by hospital are nice and on time. Doctors are polite and co-operative with patient.
Ankita Jagtap
All services provided by hospital is good. Hygiene maintained well.Even at night good care provided.